Ad will apear here
Next
विज्ञानगप्पा

पुणे : ‘बहिरेपणामुळे व्यक्तीच्या सामाजिक प्रगतीमध्ये अडथळे येतात. चांगले शिक्षण, नोकरी आणि आयुष्यातील इतर संधी त्यांच्यापासून दुरावतात. अनेकदा बहिरेपणाचा फायदा घेऊन, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होतात. वेळीच निदान आणि योग्य उपचार घेतले, तर तंत्रज्ञानाच्या साह्याने बहिरेपणाची तीव्रता कमी होऊ शकते,’ असे प्रतिपादन मुंबईतील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. दीपाली जोशी यांनी केले.

‘मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग’ आणि ‘फर्ग्युसन महाविद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने, महाविद्यालयाच्या दृकश्राव्य सभागृहात ‘विज्ञानगप्पा’ रंगल्या होत्या. या विज्ञानगप्पांमध्ये त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

कानाची संरचना, आपल्याला ऐकू कसे येते? त्यासाठी आपल्या शरीरात कार्यरत असलेली यंत्रणा, जन्मजात बहिरेपणा का येतो, त्या व्यक्तींना कोणत्या अडचणी येतात? त्या अडचणींवर मात कशी करता येते? या आणि अन्य प्रश्नांना उत्तरे देत, त्यांनी विज्ञानप्रेमींशी गप्पा मारल्या.

डॉ. दीपाली जोशी म्हणाल्या, ‘पर्यावरणीय समस्या, अनुवंशिकता यामुळे जन्मजात बहिरेपणा येऊ शकतो. हे टाळण्यासाठी ध्वनिप्रदूषण कमी होणे आवश्यक आहे. आपल्या कानावर मोठे आवाज पडणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. मूल पोटात असताना गर्भवतीने कर्कश आवाजांपासून दूर राहिले पाहिजे. बहिरेपणा आलाच तर जन्मानंतर लगेच त्याच्या तपासण्या करून योग्य उपचार घेतले, तर काही प्रमाणात ही समस्या कमी होऊ शकते. तसेच कर्णयंत्र व नवीन तंत्रज्ञानाची उपकरणे यामुळे आता उपचार अधिक सोपे झाले आहेत.’

कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विद्याधर बोरकर, विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र., सहकार्यवाह संजय मालती कमलाकर, खजिनदार भालचंद्र अत्रे यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रा. विनय र. र. यांनी अध्यक्षीय भाषण केले. डॉ. विद्याधर बोरकर यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZUCBM
Similar Posts
‘जीवसृष्टीवरील परिणामाच्या अभ्यासासाठी जीवाश्म उपयुक्त’ पुणे : ‘जीवाश्मांकडे निसर्गात आढळणाऱ्या विस्मयकारक चमत्कृती म्हणून केवळ कुतूहलाने पाहता कामा नये. पर्यावरणातील बदलांमुळे जीवसृष्टीवर अनेक विपरीत परिणाम होत असतात. जीवशास्त्र आणि भूशास्त्र यांच्या सीमेवर असलेल्या पुराजीवशास्त्रातील जीवाश्मांचा उपयोग जीवसृष्टीवरील परिणाम अभ्यासण्यासाठी होतो,’ असे मत आघारकर संशोधन संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ
डॉ. बोरकर यांच्याशी जीवाश्मांवर ‘विज्ञानगप्पा’ पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगप्पां’ची मालिका आयोजित करण्यात आली आहे. यातील पहिले व्याख्यान १२ जानेवारी रोजी होणार आहे.
प्रा. नलावडे यांच्याशी ‘विज्ञानगप्पा’ पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विज्ञानगप्पां’च्या मालिकेत प्रा. संजीव नलावडे संवाद साधणार आहेत.
‘डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी वापरावी’ पुणे : ‘परिसरात, घरात साठलेल्या पाण्यामध्ये, अस्वच्छ्तेच्या ठिकाणी, भाताच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर डास वाढतात. कळत नकळत ते आपल्याला चावतात. यातून हिवताप, हत्तीरोग, डेंगी, चिकनगुणिया, झीका अशा गंभीर रोगांचा प्रसार होतो. डास हा माणसाचा मोठा शत्रू असून, या जीवघेण्या आजारांवर नियंत्रण आणायचे असेल, तर डासांपासून बचाव करता आला पाहिजे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language